mrityunjaymahanews
अन्य

राष्ट्रवादीचे विमान सुसाट…

आजरा साखर कारखान्यात तालुका संघाची पुनरावृत्ती…

राष्ट्रवादीचे विमान सुसाट

                आजरा:प्रतिनिधी

    आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तालुका खरेदी विक्री संघाच्या निकालाची पुनरावृत्ती झाली असून राष्ट्रवादीप्रणीत श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांनी विरोधी भाजप राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना व स्वाभिमानीच्या श्री चाळोबा देव विकास आघाडीचा सुमारे ६०० मतांनी धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला. ब वर्ग गटातील अशोक तरडेकर  हे केवळ चार मतांनी विजयी झाले. विरोधी आघाडीचे पराभूत उमेदवार नामदेव नार्वेकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली.  फेर मतमोजणीत तर्डेकर हे १४ मतांनी विजयी झाले.  या निवडणुकीत कारखान्याच्या बहुतांशी विद्यमान संचालकांना पराभवाचा झटका बसला आहे. याचे दूरगामी परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसह नगरपंचायत निवडणुकीवर होणार आहेत.

        निवडणुक निकाल पाहता कारखान्यावर संचालक म्हणून राजेश जोशीलकर(भादवण), दीपक देसाई (मडीलगे),राजू मुरकुटे(कानोली) काशिनाथ तेली(होन्याळी),, शिवाजी नांदवडेकर(वाटंगी) संभाजी पाटील(हात्तिवडे), रणजीत देसाई(सुलगाव), गोविंद पाटील(घाटकरवाडी), सौ. मनीषा देसाई(वेळवट्टी), सौ.रचना होलम, हरिबा कांबळे(पेरणोली) अशोक तर्डेकर (मलिग्रे) या तब्बल १२ नव्या चेहऱ्यांना संचालक पदाची संधी मिळाली आहे.

मुकुंदराव देसाई विष्णुपंत केसरकर, एम. के.देसाई,वसंतराव धुरे, मारुती घोरपडे, अनिल फडके, उदय पवार हे संचालक पुन्हा एकदा विजयी झाले आहेत.

शिवसेनेचे संभाजी पाटील हे श्री चाळोबा देव विकास आघाडीतून यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.

उमेदवार निहाय मते….

उत्पादक गट नंबर १ (उत्तूर-मडिलगे) :

रवळनाथ विकास आघाडी –

मारुती घोरपडे (उत्तूर) – 8562

दीपक देसाई (मडिलगे) – 8498

वसंतराव धुरे (उत्तूर) – 8753

चाळोबा विकास आघाडी –

प्रकाश चव्हाण (चव्हाणवाडी) – 7038

उमेश आपटे (उत्तूर) – 8073

भिकू गुरव (मडिलगे) – 7360

गट नंबर २ (आजरा-श्रृंगारवाडी गट ) :

रवळनाथ विकास आघाडी –

मुकुंद देसाई(आजरा) – 8691

शिवाजी नांदवडेकर (वाटंगी) – 8040

सुभाष देसाई (सिरसंगी) – 8231

चाळोबा विकास आघाडी –

अशोक चराटी (आजरा) – 7495

अभिषेक शिंपी (आजरा) – 7385

विजय देसाई (वाटंगी) – 7067

अपक्ष –

दिगंबर देसाई (सिरसंगी) – 126

महादेव होडगे (यमेकोंड) – 80

तुळसाप्पा पोवार (देऊळवाडी) – 231

गट नंबर ३ (पेरणोली-गवसे गट ) :

रवळनाथ विकास आघाडी –

उदयराज पवार (पेरणोली) – 8555

रणजीत देसाई (सुलगांव) – 8693

गोविंद पाटील (घाटकरवाडी) – 8351

चाळोबा विकास आघाडी –

राजेंद्र सावंत (पेरणोली) – 6930

दशरथ अमृते (हाळोली) – 7162

सहदेव नेवगे (गवसे) – 7035

 

अपक्ष –

शांताराम पाटील (दाभिल) – 381

शामराव बोलके (माद्याळ) – 160

गट नंबर ४ (भादवण-गजरगाव गट ) :

रवळनाथ विकास आघाडी –

एम. के. देसाई (सरोळी) – 8800

राजेश जोशीलकर (भादवण) – 8760

राजेंद्र मुरकुटे (कानोली) – 8199

चाळोबा विकास आघाडी –

अजंना रेडेकर (पेद्रेवाडी) – 7717

सुधीरकुमार पाटील (कानोली) – 7123

संजय पाटील (भादवण) – 7243

अपक्ष –

आनंदा पाटील (सरोळी) – 147

गट नंबर ५ (हात्तिवडे-मलिग्रे गट) :

रवळनाथ विकास आघाडी –

विष्णूपंत केसरकर (किणे) – 8926

अनिल फडके (सुळे) – 8524

संभाजी पाटील(हात्तिवडे) – 8788

चाळोबा विकास आघाडी –

सुनिल शिंत्रे (मेंढोली) – 7937

आनंदराव बुगडे (मलिग्रे) – 7312

सुरेश सावंत (कोळिंद्रे) – 7194

बिगर उत्पादक गट (ब वर्ग ) :

रवळनाथ विकास आघाडी –

नामदेव नार्वेकर (पोळगांव) – 1370 (पराभूत)

चाळोबा विकास आघाडी –

अशोक तर्डेकर (मलिग्रे) – 1384 (विजयी)

अनुसूचित जाती जमाती :

रवळनाथ विकास आघाडी –

हरिभाऊ कांबळे (पेरणोली) -10356

चाळोबा विकास आघाडी –

मलिककुमार बुरूड (आजरा) – 9015

इतर मागास :

रवळनाथ विकास आघाडी –

काशिनाथ तेली (होन्याळी) – 9823

चाळोबा विकास आघाडी –

जनार्दन टोपले (आजरा) – 9446

महिला प्रतिनिधी :

रवळनाथ विकास आघाडी –

रचना होलम(पोळगांव) – 9870

मनिषा देसाई (वेळवट्टी) – 10246

चाळोबा विकास आघाडी –

सुनिता रेडेकर (सरंबळवाडी) – 8908

संगीता माडभगत (साळगाव) – 8441

 

प्रमुख पराभूत उमेदवार पुढीलप्रमाणे…

      शिवसेना ( उ.बा.ठा.) जिल्हाप्रमुख व विद्यमान अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिता रेडेकर, माजी संचालक दशरथ अमृते, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्रसिंह सावंत, भाजपाचे माजी उपसभापती मलिककुमार बुरुड, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष व विद्यमान संचालक जनार्दन टोपले यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, नगरसेवक अभिषेक शिंपी,माजी पं.स. सभापती भिकाजी गुरव, भादवणचे माजी सरपंच व शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील आदींचा समावेश आहे.

सुधीर देसाई यांच्या राजकीय खेळ्या यशस्वी…

     तालुका संघातील विजयानंतर जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्या जोडीने केलेल्या राजकीय खेळ्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत यशस्वी ठरल्या. राष्ट्रवादीच्या समर्थक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तयार केलेल्या आघाडीने विजयापर्यंत मजल मारली. यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील व माजी आमदार के. पी. पाटील यांनी या आघाडीला दिलेले नेटके बळ उपयोगी ठरले.

प्रचारातील विस्कळीतपणाचा विरोधी आघाडीला फटका…

      निवडणुक बिनविरोध होणार म्हणून विरोधी आघाडीने दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना प्राधान्याने संधी दिली होती. परंतु ऐनवेळी राष्ट्रवादीने उमेदवार उभे करून विरोधी आघाडीची गोची केली. मतदान प्रक्रियेत हे उमेदवार चालणार नाहीत याची कल्पना असूनही ऐनवेळी त्यांना थांबवणे विरोधी आघाडीला जड गेले. मतदान प्रक्रियेपर्यंत विरोधी आघाडीच्या एकाच मतपत्रिकेवर असणाऱ्या उमेदवारांमध्ये कुठेही सुसूत्रता अथवा समन्वय दिसत नव्हता याचा फटकाही बसला.

सोशल मीडियाने बॅकफुटवर आणले…

      या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व त्यांच्या विरोधात आघाडी तयार होईल अशी सुरुवातीला परिस्थिती होती. त्यामुळे सुरुवातीला झालेल्या पत्रकार बैठका, कार्यकर्ते व कामगारांचे मेळावे यामध्ये शिंपी-चराटी, तानाजी देसाई, संजय पाटील व अंजनाताई रेडेकर, प्रा. सुनील शिंत्रे आदींनी एकमेकांवर जोरदार आरोप केले होते. अनपेक्षितरित्या ही सर्व मंडळी एकाच आघाडीत आली. विरोधकांनी मात्र या आरोपांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलेच भांडवल केले. याचाही फटका विरोधी आघाडीला बसला.

जाहीर सभा टाळल्याचाही फटका...

      एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश पाटील व माजी आमदार के.पी. पाटील यांच्या माध्यमातून जाहीर सभांचा धुरळा उडवला. दुसरीकडे मात्र विरोधी आघाडीने जाहीर सभांना बगल दिल्याचे दिसत होते. या आघाडीच्या पाठीशी ठामपणे कोणीही नसल्याचा अपप्रचार यामुळे झाला.आम. सतेज पाटील यांची अण्णाभाऊ सभागृहात झालेली मार्गदर्शन बैठक वगळता इतर कोणीही नेते प्रत्यक्षात निवडणूक चित्रात आले नाहीत. त्यांचीही भूमिका सावध दिसत होती. वातावरण निर्मितीमध्ये ही आघाडी अपयशी ठरली.

 आम. आबिटकर यांना धोक्याचा इशारा…

        पेरणोली-गवसे व आजरा-श्रृंगारवाडी गटात अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी, कारखान्याचे माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे असणारे वर्चस्व यापूर्वी वेळोवेळी सिद्ध झाले आहे. शिंपी चराती गटाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या भागाने आम. प्रकाश आबिटकर यांनाही सलग दोन वेळा साथ दिली आहे. कारखान्यात मात्र या भागातील मतदानात झालेली पीछेहाट पाहता आम. आबिटकर यांना हा धोक्याचा इशारा समजला जात आहे. या भागातील डॅमेज कंट्रोल करण्याचे आव्हान आम.आबिटकर यांच्यासमोर आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!